दशामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो, ही योजना एकूण तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पैशाचे वितरण करते, प्रत्येक हप्ता हा 2000 हजार रुपयांचा असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो, पिक विमा योजनेअंतर्गत मोठ्या व संख्येने शेतकरी पात्र आहेत व आतापर्यंत एकूण 16 हप्त्यांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेले होते, व आता 18 जून 2024 ला 17 वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे.
पी एम किसान योजने प्रमाणेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू करण्यात आलेली आहे, ही योजना सुद्धा दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देते म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12 हजार रुपये एवढी रक्कम मिळते, पी एम किसान योजनेचे 2000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 जूनला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलेले आहे.
18 जून रोजी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या हप्ता वितरणांने शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे, कारण खरीप हंगामाच्या पेरण्याला सुरुवात झालेली असून या काळामध्ये दोन हजार रुपये मिळाल्याने एक प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे, तसेच तुम्ही जर एक शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेली आहे की नाही हे आपले खाते चेक करून तपासू शकता.
मोफत गॅस सिलिंडर नंतर आता मिळणार मोफत सोलर स्टोव्ह , यांना मिळेल लाभ