या योजने अंतर्गत मध व्यवसाय करण्यासाठी मिळवा 50 टक्के अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया | Madh Yoajan Anudan

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जातात त्यातीलच असे अनेक तरुण आहेत, की जे विविध प्रकारचे व्यवसाय करतात त्यातीलच एक व्यवसाय म्हणजेच मध व्यवसाय व अशाच नागरिकांना मध व्यवसायासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान सुद्धा योजनेच्या माध्यमातून दिले जाते, जर तुम्ही मधाचा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे, याचा लाभ अगदी सहजरित्या घेतल्या जाऊ शकतो, व योजनेच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

 

महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून मध योजना राबवली जाते, योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साहित्य स्वरूपामध्ये पन्नास टक्के एवढे अनुदान सुद्धा दिले जाते, त्याबरोबरच मध उद्योगाचे अगदी योग्य असे प्रशिक्षण सुद्धा योजनेच्या माध्यमातून दिले जाते. व लाभार्थ्याला यातील मुख्य फायदा म्हणजेच योजनेच्या माध्यमातून शासनाच्या मुख्य हमीभावाने मधाची खरेदी केली जाते.

 

योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करणे आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही जर मध योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर 30 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, हिंगोली जिल्हा ग्रामोद्योग मंडळाने ही जाहिरात काढलेली आहे, अर्थातच हिंगोली जिल्ह्यांमध्ये योजना अंतर्गत लाभार्थ्याला लाभ दिला जाईल.

 

मधपाळ हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, तसेच त्या मधपाळाचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे ही अट सुद्धा यात आहे, यामध्ये केंद्र चालक मदपाळ असल्यास ही अट असून, जर स्वतःची शेती असेल तर यामध्ये वयोमर्यादा 18 वर्षे एवढी असून त्यात प्राधान्य दिले जाईल, अशाप्रकारे मद योजनेच्या माध्यमातून सहजरीत्या लाभ घेतला जाऊ शकतो व पन्नास हजार रुपयांचे अनुदान साहित्य स्वरूपामध्ये दिले जाईल.

 

उडीद आणि मुगाच्या दरात वाढ, अजून वाढणार दर, जाणून घ्या दर 

Author