खरीप व रब्बी हंगाम 2023 मधील नुकसान भरपाई, तुम्ही पात्र आहात का? | खरीप व रब्बी हंगाम 2023 मधील नुकसान भरपाई, तुम्ही पात्र आहात का? | Pik Vima Yojana 

शेती करत असताना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती व विविध प्रकारचे संकट शेतीवर येऊन पडते त्यामुळे एक प्रकारे शेतीला संरक्षण मिळावे या उद्देशाने खरीप व रब्बी हंगामाचा पिक विमा मोठ्या संख्येने शेतकरी पिक विम्याचा अर्ज भरता त्यामध्ये जर अतिवृष्टी किंवा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला असेल, म्हणजेच नैसर्गिक संकट उद्भवले असेल तर शेतकऱ्यांना मध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान बघून त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते यावर्षी राज्यातील विविध शेतकऱ्यांना 25 टक्के एवढ्या पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले होते.

 

राज्यामध्ये 2023 पासून सर्वसमावेश विमा योजना चालू करण्यात आलेली आहे, योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून, जी काही राज्य सरकारच्या वाट्याची रक्कम होती ती रक्कम कंपनीला वाटप करण्याबाबत सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2023 व 24 या वर्षासाठीची सुद्धा रक्कम पिक विमा कंपनीला देण्याबाबतचा घेण्यात आलेला असून तीच विमा कंपनीला राज्य हिस्या ची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकर्याना सुद्धा ही रक्कम मिळेल.

 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजेच बाधित शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे, खरीप व रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या व त्यांची तपासणी म्हणजेच पिकांची पाहणी करण्यात आलेली होती, अश्या शेतकऱ्यांना तर नुकसान भरपाई दिली जाईल त्यामुळे तुम्ही जर खरीप हंगाम 2023 कालावधीमध्ये खरीप किंवा रब्बी हंगामाच्या नुकसान भरपाई संबंधित तक्रारी केलेल्या असेल तर शेतकऱ्यांना अर्थातच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. अशा प्रकारचा अहवाल विविध कंपन्यांना दिला जात आहे.

 

शेतकऱ्यांनो तुमचे सोयाबीन पिवळे पडले का? लगेच हे व्यवस्थापन करा

Author